Saturday 7 February 2015

पोहरादेवी आणि संत सेवालाल महाराज यांचे नाते

पोहरादेवी आणि बंजारा समाज यांचे अतूट असे
नाते आहे. बंजारा व्यक्तीच्या जीवनात
पोहरादेवी या गावाला अन्यय साधारण असे महत्व
आहे. सुमारे 250 वर्षापूर्वी संतमुर्ती सेवादास
महाराज हे बंजारा वंशात अवतारी पुरूष होवून गेले.
सेवादास महाराजांना बंजारा समाज कुलदैवत
मानतात. सेवादास महाराज हे बंजारा वंशात
तिसरा अवतार असल्याचे सांगितल्या जाते.
ज्यावेळेस समाजात अन्याय होते. त्यावेळेस
समाजात अवतारी पुरूष जन्म घेत असल्याचे दिसून
येते. तसंच काहीसं बंजारा समाज गावागावी भटकत
असतंाना गाईच्या पाठीवर गहू, ज्वारी , तांदूळ
टाकून व्यापार करत असतांना त्यांच्यावर विविध
स्वरूपाचे अन्याय होत असत. हया अन्यायापासून
मुक्ती देण्यासाठी त्यांना स्वाभीमानाचे जिवन
जगता यावे यादृष्टीने व गोर
बंजारांना वाचविण्यसाठी श्री जगदंबा देवीने
सेवादास महाराजाला बंजारा समाजात अवतार
घेण्यासाठी सांगितले व तद्नुसार संत श्री सेवादास
महाजांचा जन्म कर्नाटक राज्यात
गुत्तीबल्लारी या गावी मार्गशिष महिन्यात शुक्ल
पक्षात शुभनक्ष़त्री 15 फेब्रु. 1739 रोजी झाला.
संत सेवादास महाराज यांच्या जन्माची एक
आख्यायीका आहे. सेवादास महाजाचे वडील
श्री भिमानाईक व आई धर्मळीमाता यांना मुलबाळ
नव्हते. बंजारा समाजात पूर्वी पासूनच
श्री जगदंबा देवीची आराधना करतात.
श्री भिमानाईक व धर्मळीमाता आपल्याला मुल
व्हाव यासाठी जगदंबा देवीच्या नावाने
तपश्चर्येला बसले. सतत तपश्चर्या सुरू होती.
भिमा नाईक अत्यंत कृश झाले होते. सगळीकडे
हळहळ सुरू झाली.
तेव्हा जगदंबा देवी एका बाईच्या साध्या रूपात
प्रसन्न झाली. तुम्हीला पैसा ,संपत्ती सा-
या गोष्टी असतांना तपश्चर्येला का बसले,
तुम्हाला काय कमी आहे. असे साध्या बाईच्या रूपात
असलेल्या जगदंबा देवीने विचारले.
तेव्हा भिमानाईकंानी आम्हाला जगदंबा देवीचा आशिर्वाद
हवा आहे. आम्हाला संतती नाही जो पर्यंत
आम्हाला देवीचे दर्शन होणार नाही, तोपर्यंत
तपश्चर्या सोडणार नाही असे सांगितले.
देवीला श्री भिमानाईक व धर्मळीमाता आपले
सच्चे भक्त असल्याची खात्री पटताच, आपले
प्रत्यक्ष रूप दाखवून
संतती होण्यासाठी आशीर्वाद दिला व तदनुसार
संत श्री सेवादास महाराजांचा जन्म झाला. बदू,
हाप्पा भामा असे तिन भावाचा जन्मा झाला.
काही दिवस जाताच भामा मरण पावला व
पुन्हा जगदंबा देवीच्या आशीर्वादाने
पुरा नावाचा भाउ जन्माास आला.
सेवादास महाराजांचे चमत्कार
जगइंबर देवीच्या आशीर्वादाने सेवादास
महाराजांचा जन्म
झाला असल्या कारणांनी लहानपणापासूनच
जगदंबा देवी महाराजांना प्रसन्न होत्या.
देवीच्या आशीर्वादाने सेवादास महाराजांनी अनेक
चमत्कार दाखविले. भजन करत
असतांना महाराजांच्या भजनात कुठल्याच प्रकारचे
वाद्य नव्हते. दगड गोटे घेवून महाराज वाजवत
होते. दगड गोटयातून वाद्यासारखा आवाज
निघल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.
मातीच्या पोळीला मातीच्या भाजीला प्रत्यक्ष
अन्नाचे रूप दिल्याचे बुजरूक मंडळीकडून ऐकण्यात
येते. गाई गुरे चरत
असतांना गाईच्या रक्षणासाठी स्वताला संकटात
टाकून जगदंबा देवीला यप्रसन्न करून
गाईच्या गुरांचे रक्षण केल्याचे सांगितले जाते. एक
वेळेस जगदंबा देवींच्या सांगण्यावरून सेवादास
महाराजांनी एका राजाच्या शेतात गाई
चरण्यासाठी सोडून दिल्या. राजाला माहित होताच
राजा लढाईसाठी आला. राजा व सेवादास
महाराजात घनघोर लढाई झाली. राजा पराभूत
झाला. सेवादास महाराजाला देवीचा आशीर्वाद
असल्याने आपण पराभूत झालो असे राजाला वाटू
लागले. सेवादास
महाराजाला मारण्यासाठी पेढयामध्ये विष कालवून
राजानी खावू घातले. परंतू देवीने दर्शन देवून
सेवादास महाराजांचे प्राण वाचविले. अशा प्रकारे
सेवादास महाराजांच्या अनेक आख्यायिका प्र​िसध्द
असून महाराजांचा मृत्यू एक चमत्कार असल्याचे
सांगितल्या जाते .
इंद्रदेवाची भेट व सेवादास महाराजांचा अंत
संत श्री सेवादास महाराजांनी माये पासून दूर राहून
ब्रम्हचारी राहण्याचा निश्चय
आपल्या मनाशी केला होता काही झाले तरी लग्न
करणार नाही असे सेवादास महाराजांनी ठरविले
होते. मात्र जगदंबा देवीला सेवादास महाराज
ब्रम्हचारी राहणे मान्य नव्हते. सेवादास
महाराजांनी लग्न करावे असा एकसारखा अट्टहास
देवीनी धरला होता. महाराज प्रत्येक
वेळी लग्नाला नकार देत होते. शेवटी एके दिवशी तू
लग्न का करीत नाही असा प्रखर प्रश्न देवीने
विचारला. तेव्हा आपणास लग्नासाठी जोड नाही.
जगातील संपूर्ण िस्त्रया जगदंबा देवीची रूप
असल्याने लग्न कोणाबरोबर करावे असे सेवादास
बोलले. इंद्रदेवाला व बृहस्पती देवाला भेटून न्याय
मागण्याचे सेवादास महाराजांनी ठरविले. हे ऐकूण
जगदंबा देवी खुश झाली व दोघे जण स्वर्ग लोकात
गेले. स्वर्गलोकांत जाण्यापूर्वी सेवादास
महाराजांनी बधुना बोलावून संागितले.
मी जगदंबा देवीसोबत शरिर येथे ठेवून आत्मरूपाने
स्वर्गात जात आहे. तेव्हा माझ्या शरिराचे रक्षण
करा. माझ्या शरिराला नारींचा स्पर्श होवू देवू
नका. नारिचा स्पर्श झाल्यास मी मरून जाईन असे
सांगून योगक्रियेनी सेवादासांनी प्राण काढला व
जगदंबा देवीसोबत स्वर्गात गेले.
इंद्रदेवाच्या सभागृहात जगदंबा देवीसोबत स्वर्गात
गेले. इंद्रदेवाच्या सभागृहात जगदंबा व सेवादास
महाराज हजर झाले. इंद्रदेवानी स्वर्गात येण्याचे
कारण विचारले. सेवादास
महाराजांनी लग्नासबंधी न्याय मागीतला.
तेव्हा इंद्रदेवानी सेवादास महाराज एक
अवतारी पुरूष असून ब्रम्हचर्य त्यांच्या भाग्यात
आहे,
त्यांना लग्नाचा जोडीदार नसल्याचे सांगितले .
जगदंबा देवीचा साक्षात पाताळ लोकांत
येण्यासाठी निघाले. जगदंबा देवीचा पराभव
झाल्याने मृत्यू लोकात सेवादास
महाराजाला पाठविण पसंत पडले नाही. देवीने दोन
रूपे धारण केली. एक रूप सेवादास महाराज बरोबर
होत तर दुस-या रूपानी सेवादास महाराजांनी आई
धर्माळीमाता त्यंाना सेवादासचा मृत्यू झाल्याचे
कळताच धर्मळी मातेला दुख अनावर झाले.
धर्मळीमाता धावत येवून सेवादासाच्या शरिरावर
पडल्या. सेवादास महाराज आत्मरूपानी स्वर्गात
जात असतांना वापस येईपर्यत स्त्रीचा स्पर्श
शरिराला होवू देवू नका असे
आपल्या भावाला सांगून गेले होते. स्त्रीचा स्पर्श
झाला तर मी वापस येणार नाही. असे सांगितले होते.
धर्मळीमातेचा स्पर्श होताच सेवादास
महाराजांचा मृत्यू शके सतराशे अठ्ठाविस शुध्द
विनायक चतुर्थ पौष मास, 2 जाने 1773 रूई तलाव
ता. दिग्रस जि.यवतमाळ येथे झाला. सेवादास
महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या समाधीची जागा पोहरादेवी ता.
मानोरा जि. वाशीम
या गावी मोठया चिंचेच्या झाडाखाली दाखविली होती.
परंतू
रूईच्या पाटलाला समाधीची डोली उचलल्या गेली नाही.
पोहरादेवी येथील पाटलांनी महाराजांची डोली सहज
उचलल्याने पोहरादेवी या गावाला बंजारा समाजात
अनन्य साधारण महत्व प्राप्त होवून ऐतिहा​सिक
रूप प्राप्त झाले.
पोहरादेवी यात्रा सेवादास
महाराजांनी पोहरादेवी या गावी समाधी घेतली असल्याने
या गावाकडे बघण्याचा बंजारा समाजाचा ष्टीकोन
बदलून गेला. पोहरादेवी म्हणजे संत सेवादास
महाराज साक्षात असल्याचे लोकांना वाटू लागले व
याच कारणंानी वर्षाकाठी चार वेळेस
या गावी यात्रा रु लागली. दिवाळीच्या पूव दिवस
माडी पौणमेला , खुद दिवाळीच्या दिनी,
दिवाळीच्या नंतर दिवसांनी व मार्च महिन्यात
रामनवमीला, सेवादास
महाराजांच्या जन्मदिनी यात्रा रु लागली. हळूहळू
यात्रेचे महत्व वाढत गेले. यात्रेच्या माध्यमातून
सेवादास महाराज कितीतरी भाविक क्तांना प्रस
होवू लागले. प्रत्येक यात्रेला क्तगण नवस कबूल
करुन नवसाची परत फड यात्रेला करु लागले. आज
पोहरादेवीची यात्रा भारत भर गाजत आहे.
पोहरादेवी या गावाचे नांव भारताच्या इतिहासात
गाजत आहे. रामनवमीच्या यात्रेला कर्नाटक,
आंध्रप्रदेश व इतर प्रांतातील बंजारा लोक तर
लाखोच्या संख्येने यात्रेला येतात. परंतू इतर
जाती जमातीतील लोक सुध्दा अक्षरश तुटून
पडतांना दिसून येतात.
दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती असे
संताचे वचन आहे. संताचा जन्म मुळातच
विवाच्या कल्याणासाठी मानवजातीच्या उध्दारासाठी असतो धर्म
वेगळा असेन पंथ वेगळा असेन राज्य वेगळे असेन
पण प्रत्येक संताने समाजाला माणुसकी हाच धर्म
शिकवला.
अशाच एका थोर संतोच नाव आहे प.पू. डॉ. रामराव
महाराज पोहरादेवी होय तीच
पोहरादेवी मानोरा तालुक्यातील एक खेडवळ शहर
वाशीम जिल्हयाच्या टोकावर वसलेले. यवतमाळ
जिल्हयाच्या िसमेला लागून असलेले.
एरव्ही ारताच्या ग्रामिण भागाची तेथील
गावाची परिस्थीती जशी आहे तशी
स्तिथी पोहरादेवीची पण पोहरादेवी हे फक्त
खेळवळ गाव नाही तर ते अखिल ारतीय
बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराज यांचे
रहिवाशी गांव आहे. बंजारा समाजाचे आदर्शगुरु
संत सेवालाल महाराज यांची समाधी येथे आहे तर
जागृत जगदंबेचे येथे व्य व पुरातन मंदिर आहे. प.पू.
संत डॉ. रामराव महाराज यांच्याबाबत अनेक
आख्यायिका त्यांचे क्त नित्याने सांगत असतात.
आंध्रप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामरावा हे
महाराजांचे निस्सीम क्त होते. नांदेडचे स्व.
शंकरराव चव्हाण हे ही होते. राज्याचे
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
आजही त्यांना काही विशेष अडचण असल्यास यांचे
मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात. अनेक
राजकिय नेत्याप्रमाणे अनेक
नोकरशाहाही महाराजांचे निस्सीम क्त आहे.
महाराजांचा क्त परिवार हा आसेतू हिमालय
पसरला आहे. इकाँच्या पक्षाध्यक्ष
सोनिया गांधी यांनी जेव्हा बेल्लारी मधून निवडणूक
लढवली होती. त्यावेळेस त्यांचा प्रचार्थ संत
रामराव महाराज बेल्लारीला गेले होते.
संत डॉ. रामराव महाराज यांचे राजकिय नेत्यांसोबत
सलोख्याचे सबंध असले तरी त्यांनी उपेक्षीत
बंजारा समाज यासाठी नेहमीच आपली ूमिका ठाम
ठेवली आहे. बंजारा समाजाला संपूर्ण देशात
व्ही.जे. एन.टी. हा प्रवर्ग मिळावा यासाठी प.पू.
संत डॉ. रामराव महाराज यांनी विशेष प्रयत्न केले
आहे व अद्यापही त्याबाबत त्यांचा लढा सुरु आहे.
बंजारा समाज हा उपेक्षीत तर आहेच पण
अशिक्षीतज व रुढीवादी आहे. बंजारा समाजाने
शिकले पाहिजे.
यासाठी समाजाच्या वेगवेगळया कार्यक्रमात
आपल्या प्रवचनात ते नेहमीच सांगतात माता-
पिता आणि गुरुच्या आज्ञेचे पालन करावे.
या संसारात पिुरुषांनी नेकीने राहत घराला मंदिराचे
स्वरुप द्यावे , गोपालन , ूमिसेवा लंबाडीबोल ाषा,
वेशूषा यामध्ये कोणताही बदलाव त्यांनी करु नये ,
बालविवाह व हलाली खाउ नये , खाटकाला गाय
विकू नये , व्यसनापासून नउ दिवस एक वेळेस जेवण
करावे यादरम्यान मासाहार करु नये असेही डॉ. संत
रामराव महाराज नेहमी सांगत असतात. डॉ. संत
रामराव महाराज यांची उपेक्षीत
समाजाप्रती असलेली निष्ठा त्यंानी त्यांच्या विचारात
केलेले परिवर्तन
बंजारा समजाला त्यंानी दिलेली दिशा ,
बंजारा समाजासाठी त्यंानी दिलेला लढा हया सर्व
बाबी ध्यानात घेवून कर्नाटक मधील
गुलबर्गा विद्यापिठाने त्यंाना डि.लिट ने
गौरवान्वीत करुन त्यांच्या कार्याला गौरवान्वीत
केले. कर्नाटकचे महामहिम राज्यपाल
यांनी ही मानद पदवी संत रामराव महाराज
यांना दिली.

1 comment: